पुणे: विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप ला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सध्या सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. युतीच फ़ॉर्म्युला पूर्वीच ठरला असून आता ५०-५० सत्तावाटप होणार अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आलीये.
तर भाजप ने मात्र आमचं ठरलंय याला स्पष्ट नकार दिला आहे. मुख्यमंत्रीपदाबाबाद कुठीलीही तडजोड करणार नसल्यचे सकाळीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल आहे. तर राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
मुनगंटीवार म्हणले की, युतीची चर्चा ही टीव्ही वर नसते होत. त्यामुळे आता टेबल पे चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर मग ५०-५० करायचं की ६०-४० करायचं हे ठरवण्यात येणार आहे. युतीत मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही फॉर्मुला ठरला नसल्यचेही त्यांनी जाहीर केलं आहे.