Sanjay Raut – भाजपने कॉंग्रेस पक्षावर टीका करणारी एक पुस्तिका प्रकाशित केली असून त्याचा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रतिवाद केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या नेतृत्वाशिवाय देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली नसती. ( Sanjay Raut | Congress | independence )
देशाला एकसंध ठेवण्याचे श्रेय कॉंग्रेसचेच आहे असे नमूद करून राऊत म्हणाले की, काँग्रेस नसती तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते, देशाला नेतृत्व मिळाले नसते आणि विज्ञानात तंत्रज्ञनात प्रगती झाली नसती. अशा बऱ्याच गोष्टी भाजपला कधीच समजणार नाहीत कारण ते देशासाठी विचार करत नाहीत. ते फक्त उद्योगपतींचा विचार करतात.
शनिवारी मुंबईतील धारावी येथे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्यावेळी भाजपने ‘काँग्रेस नही होती तो क्या होता’ ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी ही प्रत्रिकीया दिली.
राऊत म्हणाले की, काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते. देश एकसंध राहिला नसता. भाजपवर सडकून टीका करताना राऊत म्हणाले, ज्यांच्याकडे राजा आहे, त्यांची प्रजा आजाराने ग्रस्त आहे. भाजप देशाला कंगाल करत आहे.
त्या उलट भाजप नसता तर इतर गोष्टी झाल्या नसत्या. देशात दंगली झाल्या नसत्या, देशाचा रुपया मजबूत झाला असता, कर्ज कमी झाले असते, राफेल ते इलेक्टोरल बाँडपर्यंतचे घोटाळे झाले नसते असा दावा राऊत यांनी केला. ( Sanjay Raut | Congress | independence )