Raj Thackeray । मनसे ( MNS ) अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, अशी घोषणा त्यांनी मंगळवारी (दि. 9 एप्रिल) शिवतीर्थावर आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात केली आहे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देणार की नाही? राज ठाकरेंनी महायुतीसोबत जायचा निर्णय घेतला तर मनसेला लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून किती जागा दिल्या जाणार? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांवर स्वत: राज ठाकरेंनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. । Raj Thackeray | BJP Campaign
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “मला कशाचीही अपेक्षा नाही, देशाच्या भवितव्यासाठी सक्षम नेतृत्व हवे म्हणून केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मात्र असं असलं तरी राज ठाकरे भाजपच्या प्रचाराला जाणार की नाही? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी याबाबतचं विधान केलं आहे. मीडियाशी बोलताना महाजन म्हणाले की, “राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक आहे. हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. । Raj Thackeray | BJP Campaign
या देशाचं हित महत्त्वाचं आहे. हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाळ जोडली गेली आहे. 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला होता. राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारत बलशाली देश असून अर्थव्यवस्थेत भारत पुढे आहे. हा सगळा विचार करून राज यांनी भाजपला पाठिंबा दिला,
असं सांगतानाच प्रचाराला जायचं की नाही त्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही याचा निर्णय स्वतः राज ठाकरे घेतील. येत्या 13 एप्रिल रोजी राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्यात निर्णय जाहीर केला जाईल, असं प्रकाश महाजन यावेळी म्हणाले. । Raj Thackeray | BJP Campaign