मुंबई – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसह सरकार बनवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेसशी चर्चेचा सीलसीला सुरूच ठेवला आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत शिवसेनेच्या भूमिकेवर जोरदार आगपाखड केली. या पार्श्वभूमीवर अब हारना और डरना मना है, असे ट्विट खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
अब हारना और डरना मना है.. pic.twitter.com/mMCZyQmr84
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2019
संजय राऊत म्हणाले कि, जेव्हा मनात हारलो ही भावना निर्माण होते तेव्हा पराभवच होतो आणि विजय तेव्हाच होतो जेव्हा दृढ निश्चय केला असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी रात्री अँजिओप्लास्टी करण्यात आली. यानंतर त्यांना बुधवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असून बहुमताचा आकडा आमच्याकडे आहे, असा दावा पुन्हा एकदा राऊतांनी केला होता.
दरम्यान, अमित शहा यांनी म्हंटले कि, “निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी स्वतःही “जर युतीचा विजय झाल्यास देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील.’असे अनेकवेळेस भरसभेतही सांगितले होते. तेंव्हा कोणीही आक्षेप घेतला नव्हता. आता शिवसेनेकडून नव्याने करण्यात येऊ लागलेल्या मागण्या मान्य करणे शक्य नाही.