नवी दिल्ली – समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य (swami Prasad Maurya) यांनी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीसाठी हिंदू महासभेला (hindu Mahasabha) जबाबदार धरले आहे. जिना यांनी नव्हे तर हिंदु महासभेने दोन राष्ट्रे मागितल्यामुळे भारत आणि पाकिस्तानची धर्माच्या आधारावर फाळणी झाली, असे मौर्य यांनी सांगितले.(Hindu Mahasabha partition of India)
उत्तर प्रदेशातील बांदा येथे माध्यमांशी बोलताना समाजवादी पक्षाच्या नेत्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, हिंदु राष्ट्राची (hindu Rashtra) मागणी करणारे लोक देशाचे शत्रू आहेत. भारताची राज्यघटना सांगते की श्रद्धा, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही. जर कोणी हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असेल, तर इतर तेच का करू शकत नाहीत? हिंदू महासभेने हिंदूंच्या स्वतंत्र राष्ट्राविषयी फार पूर्वीच बोलले होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानची निर्मिती झाली. (partition of India) ऑगस्टमध्येही मौर्य यांना हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यामुळे विरोधाला सामोरे जावे लागले होते.
कॉंग्रेसने व्यक्त केली नाराजी…
मौर्य यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस (Congress) नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krushnam) म्हणाले की, हिंदूंना शिवीगाळ करणे ही फॅशन बनली आहे आणि सपा नेते मौर्य यांनी मर्यादा ओलांडली आहे. ते रोज कुठेही गेले तरी ते हिंदू धर्माचा अपमान करतात. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, असेही मौर्य सांगत असतात. त्यांचे नेते अखिलेश यादव यावर मौन बाळगून आहेत. त्यामुळे मला वाटते की समाजवादी पक्षाला आता हिंदूंची आणि त्यांच्या मतांची गरज नाही,हे अत्यंत दुर्दैवी आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit jindal) यांनीही या वर्षी ऑगस्टमध्ये हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्याबद्दल सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मौर्य यांचे विधान धर्माच्या आधारावर समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवण्याच्या उद्देशाने आणि दखलपात्र गुन्हा म्हणून प्रक्षोभक आणि अपमानास्पद होते, असे जिंदाल म्हणतात.