मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आजपासून(22 डिसेंबर) ते 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील पालिका हद्दीत लावण्यात आलेली रात्रीची संचारबंदी हा मूर्खपणाचा निर्णय अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट आणि फेसबुक पोस्ट केली आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की, कोरोनाने राज्य शासनासोबत चर्चा केली आहे का?, मी दिवसा झोपेल आणि रात्री बाहेर येईल, पुन्हा एकदा मुर्खपणाचा निर्णय.
Christians start their Christmas celebrations from 12 midnight but this night curfew in Maharashtra will create hurdles in the celebrations of what is their only and biggest festival. Govt should reconsider their decision or allow churches to open even past midnight.
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) December 21, 2020
पुढे ते म्हणतात, ख्रिस्ती बांधव मध्यरात्री 12 वाजल्यापासून ख्रिसमस उत्सवाची सुरुवात करतात. त्यांच्यासाठी हा एकमेव आणि सर्वात मोठा सण आहे. राज्यात लागू करण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे या सणात अडथळे निर्माण होतील. ही बाब लक्षात घेऊन सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा व मध्यरात्रीनंतरही चर्च खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जलील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.