सिंधुदुर्ग – भाजप नेते नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तुमच्या मालकाच्या मुलाला बघून जेव्हा मी म्याऊ म्याऊ असा आवाज काढला होता.
तेव्हा तुमच्या मालकांना बर्नोल का लावावे लागले?, त्या रागापोटी दीड महिने माझ्यावर खोटी केस टाकून मला आत का टाकण्यात आले?, तुमच्या मालकाचा मुलगा वाघाची डरकाळी देतो का?, मग त्यांना बघून म्याऊ म्याऊ न करता वाघाची डरकाळी फोडायची का?, असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित करत आदित्य ठाकरेंवर टीका केली.
संजय राऊत हे नेमकं काय बोलतात ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांनी त्यांच्या घरी जाऊन ऐकावं. त्यांच्या मनाचं परिवर्तन होतंय का ते बघा, ते लोकांची भूमिका मांडत आहेत. उद्धव ठाकरेंचे आदेश त्यांच्या मातोश्रीवरील शिपाई सुद्धा मानत नाहीत. शिपाई सोडा आदित्य ठाकरे तरी त्यांचे आदेश मानतात का?, जेव्हा उद्धव ठाकरे हे मानेवरील शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात दाखल होते.
तेव्हा आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि त्यांची टोळी दाओसच्या नावाने मजा मारत होते. माझ्या वडिलांची तब्येत बरी होणार नाही, म्हणून आदित्य ठाकरेंनी स्वत: मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचले. तेव्हा त्यांना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या लोकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण थांबले, असे म्हणत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले.