मुंबई – मुंबई क्रिकेटचे अनुभवी खेळाडू तसेच सध्याचे अव्वल प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी विदर्भ रणजी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते मध्य प्रदेश संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतील.
विदर्भ संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी 3 वर्षे काम केले. या काळात विदर्भ संघाने सलग 2 वेळा मानाचा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम केला. पंडित यांच्या प्रशिक्षणाखाली रणजी करंडकच नव्हे तर विदर्भ संघाने यंदा इराणी करंडकही पटकावण्याची कामगिरी केली.
मूळ मुंबईचे असलेले पंडित यांनी मुंबईकडून पदार्पण केले होते. त्यांनी मुंबई सोडून मध्य प्रदेशकडूनही रणजी स्पर्धा खेळली होती. आता याच संघाचे प्रशिक्षक म्हणून ते काम पाहणार आहेत.