मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यात रविवारी कोरोनाचे आणखी २६ रुंग आढळून आले आहे. सर्वाधिक ३७७ कोरोना बाधित रुग्ण मुबंईत आढळले असून, आतापर्यंत ३२ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.
तर, पुण्यात १७ रुग्ण आढळले असून पिंपरी चिंचवड शहरात ४ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तसेच औरंगाबादमध्ये आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी २ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर जळगावात दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.