नवी दिल्ली : केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना वेगवेगळी वाहने चालवायला आवडतात. पण गाडी चालवताना आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे अनेकदा आपला जीव जातो. या बातमीत आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यांमुळे आपण गाडी चालवताना अपघाताला बळी पडू शकतो. चला, जाणून घेऊया.
१ . मोबाईलवर बोलू नका
अनेकदा लोक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असतात किंवा मेसेज चेक करत असतात. हे करत असताना ते हे विसरतात की आपण रस्त्यावर एकटे नाही आहोत. इतर वाहनेही रस्त्यावर असतात. गाडी चालवताना मोबाईलचा वापर केला तर आपण आपली सुरक्षितता तसेच इतरांची सुरक्षा धोक्यात घालतो. अनेक वेळा लोक गाडी चालवताना मोबाईलचा वापर करतात, त्यामुळे रस्त्यावर लक्ष जात नाही आणि अपघाताचा धोका वाढतो.
२. हेडफोन वापरू नका
कारमध्ये मोबाईल फोन वापरणे आणि बाईक चालवताना हेडफोन घालणे भारतात सामान्य आहे. बाईक चालवताना अनेकांना फोन आल्यावर कळत नाही आणि काही लोकांना बाईक चालवताना बोलणे किंवा गाणी ऐकणे आवडते. त्यामुळे असे लोक दुचाकी चालवताना हेडफोन वापरतात. हेडफोन वापरणे चुकीचे नाही पण तुम्ही गाडी चालवत असाल तर कधीही हेडफोन वापरू नका.
३. जोराने गाणी लावू नका
कार चालवताना संगीत ऐकणे कोणाला आवडत नाही? काही लोकांना कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावायला आवडते. यासाठी, उत्साही लोक आफ्टरमार्केट स्पीकर, सब-वूफर, अॅम्प्लिफायर्स आणि बास ट्यूब्सदेखील लावून घेतात. असे केल्यावर गाडीत मोठमोठ्याने म्युझिक वाजले की, त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांची गैरसोय होते, त्याचप्रमाणे कारचालकांना इतर वाहनांच्या हॉर्नचा आवाजही ऐकू येत नाही. म्हणूनच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे देखील हानिकारक आहे.
* कायद्याचे उल्लंघन
या बातमीत नमूद केलेल्या तीन गोष्टींपैकी एक गोष्ट करूनही आपण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतो. असे केल्यावर पोलिस कारवाई करू शकतात आणि चालानही कापू शकतात. याशिवाय असे करताना आपण आपला आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतो. त्यामुळे गाडी चालविताना या तिन्ही गोष्टी टाळणे कधीही योग्यच.