पुणे – काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करूनही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा मी कधीही सोडली नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहावी लागली याची खंत नाही असेही ते म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. त्यांच्या कल्पना आम्ही स्वीकारल्या आणि त्यावर काम केले. काँग्रेस हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काही वेगळं करण्याचा विचार कधीच केला नाही मला हा निर्णय घ्यावा लागला (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा) कारण काँग्रेसने मला सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले होते.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मत व्यक्त केल्याची किंमत त्यांना ‘पचनी’ पडली नाही, असे ते म्हणाले. आम्ही काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारांना आम्ही कधीच सोडले नाही.