मुंबई : आर्यन खान प्रकरणानंतर राज्यात एकच आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली असल्याचे दिसत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पुरवणाऱ्यांसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर आता भाजप नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यात भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी देखील नवाब मलिक यांच्यावर सडकून टीका केली आहे.
भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनीही नवाब मलिकांवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. तसेच मलिक यांच्यावर आरोप करताना चोराच्या उलट्या बोंबा,असे देखील म्हटले आहे.
महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या @Dev_Fadnavis यांच्यावर @nawabmalikncp यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या.
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) November 1, 2021
श्वेता महाले यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, नवाब मलिकजी, आरोप करताना कुणावर करतोय एवढे तरी भान ठेवाव.! आज वसुबारस, यानिमित्ताने एवढेच म्हणावेसे वाटते,”कावळ्याच्या शापाने गाई गुर मरत नसतात”, असे ट्विट श्वेता महाले यांनी केले होते. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये बोचरी टीका केली आहे.
@Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री असताना त्यांच्या देहबोलीवर, कुटुंबियांवर किती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली होती पण त्यांनी पराकोटीचा संयम दाखवला, कायमच. मुख्यमंत्री पदावर बसायची नुसती हौस असून भागात नाही, अंगी क्षमता, संयम आणि समंजसपणा पण असावा लागतो. @CMOMaharashtra
— Shweta Mahale Patil- श्वेता महाले पाटील . (@MLAShwetaMahale) August 24, 2021
महाराष्टाचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांपैकी एक असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांच्या सारख्याने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. जावई बापू ड्रग्ज प्रकरणात अटकेत असल्याने नवाब मियाँ ना ड्रग्जची कावीळ झाली आहे. मेंदू व तब्येत तपासून घ्या, असा सल्लाच महाले यांनी दिला आहे.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरून एनसीबी विरुद्ध एनसीपी असा सुरू असलेला संघर्ष आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना थेट इशारा दिला आहे. तर, केशव उपाध्ये यांनी मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लक्ष देण्याचे सूचवले आहे.