नागपूर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. मलिक यांनी फडवीसांची पोलखोल करणार असल्याचं म्हणत हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचं विधान केलं होत. त्यानुसार त्यांनी आज फडणवीसांवर 13 आरोप केले.
काळ्या संपत्तीबद्दल बरेच बोलता येईल. वरळीत 200 कोटींचे फ्लॅट कोणाच्या नावाने? बीकेसीत कोणाच्या फ्लॅटवर कोण राहते?
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमातही रियाझ भाटी होता. तो तिथे कसा पोहोचला?
फडणवीसांनी पूर्णपणे राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. रियाझ भाटी बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. दाऊद आणि इतर टोळ्यांशी त्याचे संबंध होते. दोन पासपोर्टसह हा पकडला जाऊनही दोन दिवसांत सुटला. हा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि फडणवीसांच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा ?
हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचे काम करतो. त्याची दुसरी बायको बांगलादेशी आहे. त्या व्यक्तीला फडणवीस यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला ?
इमरान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ. याच हाजीला फडणवीसांनी भाजपमध्ये आणले आणि अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले. त्याचा हा लहान भाऊ आहे.
बनावट नोटांच्या प्रकरणात कोणी पकडला गेला तर कॉंग्रेसवर बिल फाडायचं असंही ठरलं होतं.
पाकिस्तानच्या बनावट नोटा भारतात मिळतात. गुन्हा दाखल होतो, पण लगेच जामीनही मिळतो. प्रकरण एनआयएला दिलं जात नाही हा काय प्रकार आहे ? कारण यातील सूत्रधारांना भाजपचं संरक्षण होते.
8 ऑक्टोबरच्या प्रकरणात मुंबई व पुण्यात अटक झाल्या. इमरान आलम शेख, रियाझ शेख आणि नवी मुंबईतही एकाला अटक झाली. पण 8 लाख 80 हजार पकडल्याचं सांगून प्रकरण दाबलं गेलं.
या सगळ्यामध्ये योगायोग असा की त्यावेळी डीआरआयमध्ये समीर वानखेडे हेच होते.
14 वर्षे एखादा अधिकारी मुंबईत राहतो, यामागे काय गुपित आहे?
8 ऑक्टोबर 2017 रोजी बीकेसीतील एका छाप्यात 14 कोटी 56 लाख किमतीच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण फडणवीसांनी दाबले.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात विदेशातून फोन यायचे. पोलीस त्यावरून प्रकरण सेटल करायचे.
तुमच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात खंडणी उकळण्याचं काम सुरू होतं की नाही?
नागपूरमधील कुख्यात गुंड मुन्ना यादव याला फडणवीसांनी कन्स्ट्रक्शन बोर्डाचा अध्यक्ष कसा बनवला?