नवी दिल्ली –थॉमस-उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेसाठी सुरू करण्यात येणार असलेले सराव शिबिर अखेर रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय बॅडमिंटन संघटनेने दिली आहे. अशा स्पर्धेतून काही प्रमुख खेळाडूंनी माघार घेतल्याने संघटनेने हा निर्णय घेतला आहे. आता या स्पर्धेसाठी डेन्मार्कला रवाना होत असलेल्या संघातील पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल व किदाम्बी श्रीकांत यांच्यावरच भारताच्या यशापयशाची मदार आहे.
या स्पर्धेतून बी. साईप्रणीतने घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. अशा स्थितीत पुरुष गटात श्रीकांत याच्यासह पी. कश्यप व नवोदित लक्ष्य सेन यांच्याकडूनच कामगिरीची अपेक्षा आहे. महिला गटात सायना व सिंधू यांच्यासह अश्विनी पोनप्पा व एन. सिक्कीरेड्डी यांनाच सरस कामगिरी करावी लागणार आहे.
भारताचा बॅडमिंटन संघ
थॉमस करंडक – किदम्बी श्रीकांत, पी. कश्यप, लक्ष्य सेन, शुभंकर डे, सिरील वर्मा, मनू अत्री, बी. सुमित रेड्डी, एम. आर. अर्जुन, ध्रूव कपिला, कृष्णप्रसाद गारगा. उबर करंडक – पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आकर्षी कश्यप, मालविका बनसोड, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्कीरेड्डी, पूजा दंडू, संजना संतोष, पूर्वीशा एस. राम, जे. मेघना.