नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये सहमती झालेल्या पंचसुत्रीचा आढावा घेण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत आणि तिन्ही दलांचे प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
चालू आठवड्याच्या प्रारंभी दोन्ही देशांचे सैनिक पूर्व लडाखमध्ये पुन्हा आमनेसामने आले. त्यापार्श्वभूमीवर, तेथील सुरक्षा स्थितीची व्यापक माहितीही बैठकीत घेण्यात आली.
कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्याच्या उद्देशातून असणाऱ्या सज्जतेची माहिती लष्करप्रमुख एम.एम.नरवणे यांनी दिली. तीव्र स्वरूपाच्या हिवाळ्यात उंचावरील ठिकाणी भारतीय जवान तैनात ठेवले जाणार आहेत. त्याविषयीच्या योजनेचा तपशीलही बैठकीत देण्यात आला.