महाड: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं होतं. मात्र राणे यांना अखेर महाड न्यायालयाने दिलासा दिसा असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
राणे यांना आज महाड न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दिवसभराच्या ड्राम्यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अवघ्या महाराष्ट्राच लक्ष महाड न्यायालयाकडे लागलं होतं. जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे.
केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट राणेंनी रात्री 12.32 च्या सुमारास केलं आहे.
”नारोबा राणे”यांच्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली, शिवसेनेचा नारायण राणेंवर बेछुट हल्लाबोल
‘मी अशी चूक भविष्यात पुन्हा करणार नाही’ राणेंची कोर्टात ग्वाही
दरम्यान, दुपारी राणे यांची तब्येत बिघडली होती. त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी पथकाने त्यांची तपासणी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.