मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय नेते शिंदे सरकार निशाणा साधत आह. अशात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावरूनच भाजपवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलाचं हे काही पहिले आंदोलन नाही. याआधीही खूप आंदोलन झाले आणि मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर आणि आता मुंबईत पोहोचल. भाजपने मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना फसवलं आहे, त्यामुळे हा उद्रेक भाजपच्या विरोधात आहे असं म्हणत पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले,’ २०१४ पासूनच भाजपने महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीला समोरे जात असताना आमचं सरकार आल्यावर मराठ्यांना, धनगरांना विविध जातीच्या लोकांना सांगितलं की, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्या प्रलोभनाच्या आधारेच ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आले, असा घणाघात नाना पोटोले यांनी केलाय.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलाचं हे काही पहिले आंदोलन नाही. याआधीही खूप आंदोलन झाले आणि मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर आणि आता मुंबईत पोहोचलय. भाजपने मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना फसवलं आहे, त्यामुळे हा उद्रेक भाजपच्या विरोधात असल्याचं पटोले म्हणालेत.
काँग्रेसची भूमिका यामध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला हे आरक्षण देता येत नसेल तर हे आरक्षण काँग्रेस देणार आहे त्याबद्दल राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जातींना आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. जरांगे पाटील यांच्या आंदोलमुळे राज्य नाही तर देश वेठीस धरला जाऊ शकतो. त्यामुळे या सरकारने समस्या सोडवता येत नसेल तर पायउतार व्हावे. काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.