Nana Patole – राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असणाऱ्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. ठिकठिकणी तोडफोड करत जाळपोळीच्या घटना घडल्या. तर मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आणि हिंसाचार करू नये, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असे वर्तन करू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान, याच मुद्यांवरून आज सर्वपक्षीय बैठक होत आहे,आज आम्ही बैठकीला राज्यातील सर्व नेते उपस्थित असणार आहे. यावरून आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलतांना टीका केली आहे. नाना पाटोले म्हणाले,’आज सर्वपक्षीय बैठक होत आहे, त्या बैठकीला मी जातोय. हे सरकारला उशीरा आलेलं शहाणपण आहे. महाराष्ट्र जळतोय यातून मार्ग काढला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही बैठकीला जातोय,अस म्हणत पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर आज सकाळी साडे दहा वाजता सर्वपक्षीय बैठक, तर मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. राज्यातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारच्या हालचालींना देखील वेग आला आहे. पण मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे अनेक ठिकाणी आंदोलने तीव्र होत चालली आहेत. त्यामुळे यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानी शिंदे गटाच्या सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावण्यात आली.
या बैठकीत पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. आज झालेल्या राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये मराठा – कुणबी आरक्षणाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. याबाबत या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.