मुंबई – वानखेडे स्टेडियमवर 2011 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने षटकार फटकावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. सामना जिंकून देणारा षटकार धोनीने फटकावला होता. हा चेंडू मैदानातील ज्या आसनावर पडला त्याला धोनीचे नाव द्या, अशी विनंती मुंबई क्रिकेट संघटनेचे सदस्य अजिंक्य नाईक यांनी संघटनेला केली आहे.
गेल्या शनिवारी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली व त्यानंतर या यशस्वी कर्णधाराचा यथोचित गौरव संघटनेने करावा, असे नाईक यांनी म्हटले आहे.