तुम्हाला उत्तराखंडमध्ये देवभूमी म्हणून ओळखली जाणारी अनेक पवित्र स्थळे सापडतील. दरवर्षी लाखो भाविक आपल्या देवाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. दुसरीकडे, भारताचे सर्वात भयानक ठिकाण देखील या पवित्र भूमीवर आहे. हे ठिकाण चंपावत जिल्ह्यातील लोहाघाटमध्ये आहे. येथेच मुक्ती कोठारी नावाचा एक झपाटलेला बंगला आहे. हा परिसर भारतातील सर्वात भयानक ठिकाणांमध्ये गणला जातो.
जवळपास राहणाऱ्या लोकांच्या मते, अनेक विचित्र आवाज अनेकदा येथून ऐकू येतात. म्हणूनच मुक्ती कोठारीजवळ जाण्याची हिंमत कोणीही स्थानिक व्यक्ती करत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी अनेक गूढ घटना घडल्या आहेत. चला तर, आज लोहघाटमध्ये स्थित ‘मुक्ती कोठारी’ चा भयानक इतिहास जाणून घेऊया, जे भारतातील सर्वात भयानक ठिकाण म्हणून ओळखले जाते. मुक्ती कोठारीचा इतिहास जाणून घेतल्यावर तुम्हाला अंगावर सरसरून काटा आल्याशिवाय राहणार नाही.
सुरुवातीच्या काळात एक ब्रिटिश कुटुंब या बंगल्यात राहत असे. नंतर, त्या ब्रिटिश कुटुंबाने हा बंगला हॉस्पिटल बनवण्यासाठी दान केला. रुग्णालय बांधल्यानंतर हा बंगला खूप लोकप्रिय झाला. अनेक लोक येथे उपचार घेण्यासाठी येत असत. मात्र, एका नवीन डॉक्टरच्या आगमनानंतर अचानक सर्व काही बदलले. रुग्णांना पाहिल्यानंतर, हा डॉक्टर त्यांच्या ते कधी मरणार आहेत, याबाबत तपशिलासह दावा करीत असे. विशेष म्हणजे, रुग्णाचा मृत्यू त्याच दिवशी आणि त्याच वेळी होत असे, ज्याबाबत डॉक्टरांनी दावा केलेला असायचा.
स्थानिक लोकांच्या मते, हा डॉक्टर आपला दावा खोटा ठरू नये म्हणून ज्या रुग्णांना एका गुप्त खोलीत (मुक्ती कोठारी) नेऊन मारून टाकत असे, त्याच रुग्णांच्या आत्म्यानी त्या डॉक्टरला मारले होते. त्या सर्व रुग्णांचा आत्मा आजही मुक्ती कोठारीमध्ये भटकत आहे, असे मानले जाते. या कारणास्तव आजही कोणीही त्या ठिकाणाजवळ जाण्याचे धाडस करत नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे अनेकदा विचित्र आणि गूढ घटना घडतात.