लंडन – भारत आणि इंग्लंड संघादरम्यान आज होऊ घातलेला पाचवा आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामना अखेर रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय आणि ईसीबीने संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे. याबाबत बीसीसीआयने आपले अधिकृत स्टेटमेंट प्रसिद्ध केलं.
बीसीसीआय आणि ईसीबीने संयुक्तपणे भारत आणि इंग्लंडमध्ये मँचेस्टर येथे खेळवला जाणारा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 च्या वाढत्या पार्दुर्भावामुळे ओल्ड ट्रॅफर्डवर खेळला जाणारा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे बीसीसीआयने म्हटले.
Update: The BCCI and ECB held several rounds of discussion to find a way to play the match, however, the outbreak of Covid-19 in the Indian team contingent forced the decision of calling off the Old Trafford Test.
Details: https://t.co/5EiVOPPOBB
— BCCI (@BCCI) September 10, 2021
दरम्यान बीसीसीआय आणि ईसीबीमधील संबंध मजबूत आहेत. त्यामुळे हा सामना अन्य कधीतरी पुन्हा खेळवला जावा, अशी ऑफर बीसीसीआयने ईसीबीला दिली आहे. हा सामना पुन्हा खेळला जावा यासाठी दोन्ही बोर्ड नवीन मार्ग शोधत आहे, असेही बीसीसीआयने म्हटले.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतली आहे. तर पहिला सामना अनिर्णित होता. त्यामुळे अंतिम कसोटी इंग्लंडसाठी महत्त्वपूर्ण होती. दरम्यान या मालिकेचा निकाल लागला नसून मालिका विजेता संघ अंतिम सामना खेळवल्यानंतरच निश्चित होणार आहे.