मोरबी :– गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपी आणि ओरेवा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक जयसुख पटेल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
आरोपी जयसुख पटेल हे 1 फेब्रुवारीला शरण आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने पटेल यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे न्यायालयाने पटेल यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
विशेष तपास पथकाने मोरबी दुर्घटनेचे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात पुलाचे संचालन करणाऱ्या जयसुख पटेल यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते.
PM Modi Jacket : पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची सर्वत्र चर्चा! जाणून घ्या…काय आहे कारण
अटक टाळण्यासाठी पटेल यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने पटेल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर पटेल हे न्यायालयात शरण आले. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यत एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.