नागपूर – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी आजपासून येथिल जामठा स्टेडियमवर सुरु होत आहे. या कसोटीत यजमान भारतीय संघ घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांचेच पारडे जड राहणार आहे.
घरच्या मैदानावर नेहमीच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले आहे ते या मालिकेतही राखायचे असेल तर त्यांना पहिल्याच डावात मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, विराट कोहली व चेतेश्वर पुजारा अशी भक्कम फलंदाजी भारताकडे आहे. त्यातच संघात या खेळपट्टीचे स्वरूप पाहता तीन फिरकी गोलंदाज खेळवण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे. त्यातही रवीचंद्रन अश्विन व अक्सर पटेल यांचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे.
या दोघांकडेही फलंदाजीची क्षमता असल्याने त्यांच्या समावेशामुळे भारतीय फलंदाजी आठव्या क्रमांपर्यंत खोलवर ठरेल. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला मात्र, रवींद्र जडेजा फिट ठरल्यामुळे बाहेर बसावे लागणार आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीचा भार महंमद शमी, महंमद सिराज यांच्यावरच राहणार असून संघात तिसरा वेगवान गोलंदाज खेळवण्यात येणार नसल्याचे उघड दिसत आहे. तीन फिरकी व दोन वेगवान असा समतोल राखला जाणार आहे. यष्टिरक्षणाचा भार लोकेश राहुलवरच योणार का के. एस. भरतला संधी मिळणार हा देखिल प्रश्न आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही भक्कम असला तरीही त्यांना भारतीय वातावरणात तसेच फिरकीला साथ मिळत असलेल्या खेळपट्टीवर कीती यश मिळेल याबाबत साशंकताच आहे. त्यातही त्यांची फलंदाजीची पूर्ण मदार स्टिव्हन स्मिथ, डेव्हीड वॉर्नर, मार्नस लेबुशेन व उस्मान ख्वाजा यांच्यावरच राहणार आहे. गोलंदाजीबात बोलायचे तर पॅट कमिन्स व फिरकीसाठी नाथन लॉयन यांच्यावरच मदार राहणार आहे. जोश हेझलवूड डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे या कसोटीत खेळू शकणार नसल्याचा त्यांना फटका बसु शकतो. तसेच मिशेल स्टार्क व कॅमेरून ग्रीन यांनाही दुखापतीमुळे या सामन्यात खेळता येणार नसल्याने ऑस्ट्रेलियाला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.
Nagpur 📍
ARE YOU READY❓#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/JgRsLTZFIp
— BCCI (@BCCI) February 8, 2023
सूर्यकुमार पदार्पणासाठी सज्ज
भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पणासाठी सज्ज बनला आहे. मर्यादीत षटकांच्या सामन्यांत आपल्या आक्रमक फलंदाजीने निवड समितीलाही प्रभावीत केले असून वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने कसोटीतही यशस्वी ठरला तसाच सूर्यकुमारही ठरेल असा विश्वास व्यक्त करत निवड समितीने त्याचा कसोटी संघात समावेश केला आहे. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा त्याला पहिल्या कसोटीत खेळवणार का प्रश्न आहे.
खेळपट्टीबात द्रविड नाराज
जामठाची तयार करण्यात आलेली खेळपट्टी पाहून भारतीय संघाचे मुख्य प्रसिक्षक राहुल द्रविड यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर आले आहे. ही खेळपट्टी संपूर्ण पाच दिवस व्यवस्थित राहावी ही अपेक्षा व्यक्त करत त्यांनी क्युरेटरला ही खेळपट्टी नव्याने तयार करा अशाही सुचना द्रविड यांनी तीन दिवसांपूर्वी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर अद्याप संघ व्यवस्थापक व बीसीसीआयने दिलेली नाही.