नारायणगाव -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गरीब, गरजू आणि निराधार अशा 2 हजार 200 लोकांना एक महिना पुरेल इतका किराणा, भाजीपाला असा 15 लाखांचे शिधा वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अड संजय काळे यांनी दिली.
जुन्नर तहसील विभागाने जुन्नर तालुक्यात केलेल्या सर्वेक्षणात 3 हजार 800 गरजू गरीब आणि निराधार लोक असल्याचे स्पष्ट झाले असून, यापैकी 2 हजार 200 लोकांना बाजार समिती व उर्वरित 1600 जणांना किराणा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष निधीतून 14 लाख रुपयांचा दिले आहेत. तालुक्यातील आरोग्य सुविधासाठी 25 लाख रुपयांचा निधी आमदार निधीतून देण्यात आला आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात मोलमजुरी साठी आलेले अनेक राज्यातील मजूर आलेले आहेत, त्यांच्याजवळ रेशनिंग कार्ड नाही , त्यातच लॉकडाऊन असल्याने त्यांना कामधंदा नसल्याने अशा मजुरांनावर उपासमारीची वेळ आली होती, जुन्नर तहसील विभागाने अशा लोकांचा शोध घेऊन 3800 जणाची यादी तयार केली होती, या यादीतील अत्यावश्यक अशा 2200 जणांना किराणा शिधा वाटप नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात करण्यात आले.