इंदोरी – इंदोरी, जांबवडे, नवलाख उंब्रे, शेटेवस्ती, चावसर वस्ती, कदमवाडी, कोयतेवस्ती येथे भात पिकांचे नुकसानीचे स्थळ पाहणी करीत पंचनामे करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे भातपीक सडणे या बाबींचा समावेश करून भात पिकांचे तसेच सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान पंचनामे करण्यात येत आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून आधार कार्ड, बॅंक पासबूक प्रत व पंचनामा अर्ज कृषी अधिकारी प्रियंका पाटील भरून घेत आहेत. तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी आवाहन केले की, ज्या शेतकरी बंधूंच्या शेतातील भात पिकांचे नुकसान झालेले आहेत. त्यांनी प्रत्यक्ष नुकसान दाखवून अर्ज भरून द्यावा.
लवकरच शासनाकडून नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी कृषी अधिकारी पी. एस. पाटील, कृषी सहायक स्वाती घनवट, ग्रामसेवक वाय. जे. डोळस, जांबवडे गावच्या सरपंच सारिका घोजगे, माजी उपसरपंच दिनेश चव्हाण, माजी सरपंच एकनाथ शेटे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनकर शेटे आदी उपस्थित होते.