नवी दिल्ली : देशहिताचे निर्णय घेताना खूप काही सहन करावे लागते. नाराजी, आरोपांचा सामना करावा लागतो. प्रसंगी जनतेच्या रोषालाही सामोरे जावे लागते, असे सूचक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
ते असोचॅमच्या कार्यक्रमात बोलत होते. त्या कार्यक्रमात ते अर्थव्यवस्था, जीएसटी या मुद्द्यांवर बोलले. त्यामुळे त्यांचे सूचक वक्तव्य त्या मुद्द्यांशी निगडीत होते की देशातील सध्याच्या स्थितीबाबत याविषयी तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
मोदी सरकारने आणलेला नागरिकत्व दुरूस्ती कायदा वादग्रस्त ठरला आहे. त्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी देशाच्या विविध भागांत निदर्शने सुरू आहेत. त्या निदर्शनांना काही ठिकाणी हिसंक वळण मिळाल्याने वातावरण तापले आहे.