मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पंतप्रधान पदाबाबत भाष्य केलं. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत २०२४ च्या निवडणुकीबाबत बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतील का ? असा सवाल त्यांना विचारण्यात आला होता. संजय राऊत यांनी यावर उत्तर देताना विरोधकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे म्हंटले. राऊत यांनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला टोमणा मारला आहे.
पंतप्रधानपदाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले होते,पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र २०२४ मध्ये कोण पंतप्रधान होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. राऊत यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. यावरूनच आता संदीप देशपांडे यांनीं एक ट्विट केले आहे.
संदीप देशपांडे यांना झालेल्या मारहाणीनंतर ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. त्यातच आता संदीप देशपांडे यांनी ट्विट करत थेट उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या ट्विटमध्ये देशपांडे म्हणतात,”भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार… मज्जा आहे बाबा एका माणसाची”.
भावी पंतप्रधानांना शुभेच्छा.भंकस वाटली असेल तर माफ करा “पण बुरा ना मानो होली है “आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे तुम्ही आता पंतप्रधान होणार मज्जा आहे बाबा एका माणसाची
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 7, 2023
संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.