बराच वेळ मोबाइल वापरल्यामुळे, मुले शारीरिक खेळापासून लांब राहतात. त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे योग्य ती शारीरिक वाढ होत नाही. मान वाकून मोबाइलमध्ये लक्ष असल्याने मानेचा त्रास, पाठीचे दुखणे, स्नायू आखडणे असे शारीरिक त्रास होऊ शकतात.
पालक किशोरवयीन मुलांना वेगवेगळ्या समस्येसाठी आणत असतात.
हल्ली 10 पैकी 8 तरी पालक त्यांच्या पाल्याच्या मोबाइल वापराबद्दल मुलाला काहीतरी समजून सांगा, असा आग्रह करतात. जर या मुलांशी बोलले तर कळते की, नक्कीच ते मोबाइलचा जास्त वापर करीत असतात. या अतिवापरासाठी बरीच कारणे आहेत. सहज उपलब्धी, सर्वाचा वापर प्रत्येक गरजेसाठी मोबाइलचा वापर (म्हणजे अलार्मही आपण मोबाइलचाच वापरतो.) अशी काही कारणे आहेत, पण या अतिवापरामुळे मानसिक व शारीरिक समस्या निर्माण होतातच.
मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, आयपॅड इत्यादींच्या वापराला “स्क्रीन टाइम’ असं आपण संबोधन करू या. मग अतिवापर म्हणजे जास्त स्क्रीन टाइम. डॉक्टर, मुलांना मोबाइल द्यायचे की नाही? हल्ली सर्व मुलांकडे असते मग माझ्या मुलाला नाही दिले तर त्याचे काही परिणाम? मोबाइल किती वेळ वापरू द्यावा? असे बरेच प्रश्न, शंका पालकांच्या असतात. खरं तर ह्याचे नेमके उत्तर नाही आहे. परिस्थिती व गरजेनुसार स्क्रीन टाइम बदलावा लागतो. याचे अनेक दुष्परिणाम संभवतात.
स्क्रीन टाइमचे दुष्परिणाम भारतात, जवळजवळ सर्वच मुलांना स्मार्टफोनची उपलब्धता आहे. ते आपल्या पालकांचा फोन काही काळासाठी वापरतात.
पालकांकडूनही प्रोत्साहन म्हणून मुलांना फोन काही काळासाठी दिला जातो किंवा काही पालक मुलांना ते प्रोत्साहनपर बक्षीस देतात. आशिया खंडातील मुलांत युरोपीयन मुलांपेक्षा प्राब्लेमॅटिक फोन वापर जास्त आहे. सहसा, फोन वापरात मानसिक परिणामात मोबाइल फोन ऍडिक्शन किंवा ऑब्शेशन अशाच आजाराच्या परिणामात गणती केली जाते, पण हा अतिवापर ह्या आजारांचा व्यतिरिक्त काही मानसिकतेत दिसून येतो.
मोबाइलच्या ब्लू लाइटने झोपेचा कालावधी व दर्जा कमी होतो. त्याच्या रिंग टोन व व्हॉयब्रेशननी झोपमोड होते. 90 टक्के लोक मोबाइल जवळ ठेवून झोपतात. यामुळे नक्कीच आपण दर्जेदार झोपेपासून वंचित होत आहेत. झोप हवी झोप अशी बिकट परिस्थिती नको व्हायला. मोबाइलच्या अतिवापराने शरीरावर होणारे परिणाम बराच वेळ मोबाइल वापरल्यामुळे, मुले शारीरिक खेळापासून लांब राहतात.
त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे योग्य ती शारीरिक वाढ होत नाही. मान वाकून मोबाइलमध्ये लक्ष असल्याने मानेचा त्रास, पाठीचे दुखणे, स्नायू आखडणे असे शारीरिक त्रास होऊ शकतात. तसेच शारीरिक हालचालीअभावी कमी वयातच येणारा लठ्ठपणाही त्रासदायक आहे.
मोबाइल व वंधत्व असे काही संशोधन होत आहे. मुलांचे लक्ष विचलित होत आहे. मन एकाग्र करून अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नाही.
बऱ्याच मुलांना कंटाळा आला किंवा काहीच करायचे नसेल किंवा बिकट परिस्थितीशी जमवून घेता येत नसेल, तर ते मोबाइलचा वापर करतात. म्हणजे मोबाइल वापरणे ही एक “कोपिंग मेकॅनिझम’ झाली आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीची सामना करणारी सामाजिक यंत्रणा मुलांना तयारच करता येत नाही. मित्रांशी संभाषण करणे, भावना शेअर करणे हे होतच नाही. म्हणून बऱ्याच मुलांचे “फिलिंग बोअर्ड’, “फिलिंग फ्रस्ट्रेटेड’ असे सोशल मीडिया स्टेट्स असतात.
जास्त मोबाइल वापरणाऱ्या मुलांत सहानुभूती व जीवनातील समाधान कमी आहे असेच निष्कर्ष निघाले. हा प्रकार युवकांच्या पुढील वाढीसाठी नक्कीच त्रासदायक ठरेल. जी मुले अंतर्मुखी आहेत, ज्यांचा आत्मविश्वास कमी आहे, ज्यांचे सामाजिक कौशल्य कमी आहे, अशी मुले स्मार्ट फोनच्या जाळ्यात ओढली जातात आणि त्यांच्या या सर्व कौशल्याचा ऱ्हास होतो. जास्त फोन वापरणाऱ्या मुलांत नैराश्य व चिंतेचा आजार येण्याची शक्यता असते.
– सुचित्रा पवार