मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरात-गुजरात करू नये. या देशातील प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे. प्रत्येक राज्याकडे तुम्ही समान नजरेने पाहिले आहे. हीच आपली धारणा होती, आहे आणि राहील. या उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं. कोश्यारींचं वय काय, बोलतात काय?, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल कोश्यारींवर टीका केली.
Maharashtra : ‘…तर उठाव होणारच!’ राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक
गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटाध्यक्ष मेळावा कार्यक्रमात राज ठाकरे यांनी बोलताना जोरदार फटकेबाजी केली. राज ठाकरे म्हणाले, “राज्यपाल पदावर बसलेत म्हणून त्यांचा मी मान राखतो. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. कोश्यारी तुम्ही गुजराती-मारवाडी या समाजाला पहिल्यांदा विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?, तुम्ही उद्योगपती आणि व्यापारी आहात तर तुम्ही तुमच्या राज्यात का व्यापार केला नाहीत?, याचं कारण म्हणजे उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापार करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन नव्हती.”
Maharashtra : ‘…तर उठाव होणारच!’ राज्यपालांविरोधात संभाजीराजे छत्रपती आक्रमक
“महाराष्ट्र मोठाच होता आणि मोठाच आहे. हा देश नव्हता त्यावेळी या भागाला हिंद प्रांत म्हणत होते. या हिंद प्रांतावर अनेक आक्रमण झाली. यामध्ये मोगल, पोर्तुगीज आणि ब्रिटीश आले. परंतु या हिंद प्रांतावरती जर सव्वाशे वर्ष खऱ्या अर्थाने कुणी राज्य केले असेल तर ते आमच्या मराठेशाहींनी केले. आजही परदेशातील कोणताही प्रकल्प देशात आणायचा असेल तर त्याची पहिली पसंती महाराष्ट्र असते. कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटण्याची असते, असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.”
“काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले& मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही.”
– राज ठाकरे, मनसे अध्यक्ष