मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते सध्या निशण्यावर आहेत. त्यांनी माफी मागावी आणि त्यांना पदावरून पायउतार करावे अशी मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. तसेच या मागणीची दखल घेतली जात नसेल, तर राज्यात उठाव होणार असा इशारा राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.
भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !#कोश्यारी_हटाओ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) November 27, 2022
छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!, असे ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. याआधी त्यांनी पत्र लिहून राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
Hingoli : ऊसतोड कामगारांच्या मुलींची यशस्वी झेप; एक मुलगी ‘Engineer’ तर दोन मुली ‘MBBS’साठी पात्र
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यातच कॉंग्रेसने कोश्यारी यांचा नवा व्हिडीओ अपलोड करून 26/11च्या मुंबई हल्ल्यामधील हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओनंतर कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात “व्हिडीओ वॉर’ रंगले आहे.