मुंबई – उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना धक्क्यावर धक्के बसत असल्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. परंतु, आम्ही “फ्रिजमधल्या खोक्यां’चा शोध घेणार आहे. कंटेनरमधील मोठे खोके फ्रिजमधून कोठे गेले? आणि एवढे मोठे खोके घेण्याची कोणाची ऐपत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सर्व समोर येईल, असा पलटवार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला आहे.
“उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं…”राज ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी बुलढाण्यातील चिखली येथील सभेतून शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली. यानंतर गुवाहाटीवरून मुंबईमध्ये दाखल होताच आज एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना खोचक टोला लगाविला. एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा करणार, त्यांची मानसिकता ढासळलेली आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याने नैराश्येतून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत. मला वाटत होते की, नैराश्य येण्यासाठी त्यांना वेळ लागेल, पण ते अगोदरचं आलं आहे.
“उद्योगधंद्यावर आमचं धोतरही बोललं…”राज ठाकरेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल
यापूर्वी महाराष्ट्रात नैराश्याचे वातावरण होते, पण आम्ही नवीन सरकार बनवल्यानंतर बदलले. एका सकारात्मक दृश्य तयार झाले आहे, जनमत आमच्या सरकारबद्दल चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत, म्हणून अशाप्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून करत असल्याची टीका त्यांनी केली.
मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून-छपून करत नाही. काही लोक लपून-छपून करतात. पण अशी कामं उजेडात येतात. ती लोकांना माहिती होतात. काल दीपक केसरकरांनी एक विधान केले आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावे. हे बोलणं कुणाला लागू पडते ते पाहावे, असेही ते म्हणाले.
आता हे जे बोलतायत ते छोटे मोठे खोके आहेत. मोठे मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? मोठे मोठे खोके फ्रीज भरून खोके, फ्रीज एवढ्या कंटेनरमधले खोके कोणाकडे गेले आणि कोणी पचवले हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि ते जनतेसमोर येईल, अशी टीकाही शिंदेंनी केली.