पुणे : पुण्यातील एका नामांकित लष्करी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या 38 वर्षीय महिलेस तिचा मेंदू काेणीतरी हॅक केला असून तिच्या मनता जे विचार येतात त्याचप्रमाणे वेगवेगळया कृती घडत असल्याचे जाणवू लागले. त्यामुळे तिने थेट सायबर पाेलीस ठाणे गाठत पाेलीसांकडे स्वत:ची कैफियत मांडली मात्र, पाेलीसांनी तिची समजूत काढून तिला समजविण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून अशाचप्रकारच्या माईंड हॅकिंगच्या वाढत्या तक्रारी सायबर पाेलीसांकडे येऊ लागल्याने पाेलीस अधिकारी, कर्मचारी चक्रावून गेल्याचे पहावयास मिळत आहे.
याच पध्दतीने 25 वर्षीय एका उच्च शिक्षित तरुणाची पबजी गेम खेळताना ऑनलाईन एका तरुणीशी ओळख झाली. 2 महिने तिच्यासाेबत संर्पकात राहिल्यानंतर तिच्याशी बाेलणे बंद झाले. परंतु, त्यानंतर तिला काही सांगयचे तर ती माेबाईलवर पाॅप करुन गाणी पाठवते, तिचा फाेटाे माेबाईल स्क्रीनवर सातत्याने दिसताे, ती वारंवार त्रास देते असे भास तरुणाला हाेऊ लागले आणि त्याने याबाबत पाेलीसांकडे धाव घेत या गाेष्टीचा तपास करा अशी मागणी लावून धरली.
माझा माेबाईल काेणीतरी हॅक केला, माझा सातत्याने पाठलाग काेणीतरी करते, माझ्या डाेक्यात जे विचार ते काेणीतरी ऐकते अशा तक्रारी केल्या. परंतु अशाप्रकारात लेखी तक्रार दे असे पाेलीसांनी सांगताच नेमके काेणते मुद्दे तक्रारीत द्यावे हे तरुणास समजेना झाले. दरम्यान, पाेलीसांनी तरुणाचा फाेन, फेसबुक तपासून पाहिला तर ताे काेणी हॅक केला नसल्याचे ही स्पष्ट झाले. याचप्रकारे एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या तरुणाला त्याची पत्नी माेबाईलवर काही मेसेज करत असेल तर ते ऑफिस मधील इतरांना आपोआप समजतात, माझ्यावर काेणीतरी लक्ष्य ठेवून आहे, माझे काेणाला चांगले बघवत नाही असे भास हाेऊ लागले आणि त्याने पाेलीसांकडे येऊन याबाबत दाद मागितल्याची घटना घडली आहे.
संवाद वाढविण्याची गरज
सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक डी. हाके म्हणाले, माइंड हॅकिंगच्या तक्रारीचे केसेस वाढत असल्याचे जाणवते परंतु अशाप्रकारात संबंधित व्यक्तींचे समुपदेशन सायबर पाेलीस कर्मचारी, अधिकारी करत आहेत. संबंधित व्यक्तींना लेखी तक्रार द्या असे सांगितले तर नेमके काेणा विराेधात तक्रार द्यायची हे त्यांना समजून येत नाही. मानसाेपचार तज्ञांचा सल्ला त्यांना घ्या असे आम्ही सूचवताे. एकटेपणा, माेबाईल, लॅपटाॅपचा अतिवापर, आत्मकेंद्री वागणे याचा परिणाम संबंधितांवर झाल्याचे जाणवत असून त्यांनी कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी मनमाेकळया संवाद साधणे गरजेचे आहे.