शिवसेना आमदाराची मागणी
नागपुर : कर्जबुडाल्यामुळे सध्या डबघाईला आलेली मुंबईतील पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक म्हणजेच पीएमसी बॅंक अन्य बॅंकेत विलिन करून तेथील खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी सुचना शिवसेनेचे आमदार रविंद वाईकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
वाईकर यांनी विधानसभेत हा विषय उपस्थित करून खातेदारांच्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आपल्या ठेवी बुडाल्याचे ऐकून तेथील किमान 19 खातेदारांचा मृत्यू झाला आहे.
हा गंभीर प्रकार असून खातेदारांना दिलासा देण्यासाठी ही बॅंक अन्य बॅंकेत विलिन करणे हाच एक सक्षम पर्याय समोर आहे असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी खातेदारांच्यावतीने आपण पंतप्रधानांनाही पत्र लिहीले आहे असेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.