जम्मू : जम्मू काश्मीरात अखनुर सेक्टर मध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक जवळ झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन पाकिस्तानी जवान ठार झाले. या संबंधात माहिती देताना संरक्षणदलातील सूत्रांनी सांगितले की, पल्लनवाला आणि अखनुर सेक्टर मध्ये पकिस्तानी बाजूकडून प्रक्षोभक गोळीबार करण्यात आला.
त्याला भारतीय बाजूकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले त्यात हे दोन जण ठार झाले. काल रात्री हा गोळीबार झाला. आज सकाळी प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक हे दोन मृतदेह आढळून आले.
पण त्या जवानांची शहानिशा करता आली नाही कारण त्या भागात अजूनही अधुन मधून पाकिस्तानी बाजूकडून फैरीझाडल्या जात असल्याने तेथे तणावाचे वातावरण आहे. या चकमकीत भारतीय लष्कराची कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.