कोल्हापूर : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदारांनी संयुक्त भेट घेतली. यावेळी कोल्हापूर खंडपीठाबाबत गरज आणि सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.
याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री महोदयांनी कोल्हापूर खंडपीठासाठी सर्वांच्या उपस्थितीत लवकरच मुंबईत बैठक आयोजित करुन याबाबत निर्णय घेण्याबाबत त्यांनी सर्व आमदारांना आश्वासन दिले.
यावेळी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, विश्वजित कदम, पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, प्रकाश आवाडे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, राजू आवळे, सुरेशदादा खाडे, शहाजी बापू पाटील, शेखर निकम, वैभव नाईक, महेश शिंदे, विक्रम सावंत, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण उपस्थित होते.