पुणे – महाराष्ट्राच्या लेडीकॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera borwankar) यांचं ‘मॅडम कमिश्नर’ (Madam Commissioner Book) हे पुस्तक रविवारी 15 ऑक्टोबरला प्रकाशित झालं आणि राज्यभरात खळबळ उडाली. बोरवणकरांच्या पुस्तकाची सध्या चर्चा चालु झालीये कारण त्यांनी या पुस्तकात अजित पवाराचं थेट नाव न घेता ‘पुण्याचे मंत्री दादा’ असा उल्लेख करत पुणे पोलिसांच्या मालकीची असलेल्या येरवडा कारागृहाच्या जमिनीबाबत करण्यात आलेल्या व्यवहारासंदर्भात आरोप केलेत.
दरम्यान, दुसरीकडे या पुस्तकामधून त्यांनी कसाबच्या ( Ajmal Kasab) फाशीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. आर्थर रोड कारागृहाला इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांची सुरक्षा होती. या सुरक्षेमध्येच कसाब रोज व्यायाम करायचा तो शांत असायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांन कधीच बिर्याणी खाल्ली नाही असा मोठा खुलासा आयपीएस अधिकारी मीरा यांनी केला आहे.
मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ( Ajmal Kasab) जिवंत पकडल्यानंतर जवळपास दोन महिने तो पोलीस कोठडीत होता. चौकशीदरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांना त्यानं महत्त्वाची माहिती देखील दिली होती. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 रोजी फासावर लटकवण्यात आले असून, त्याला फाशी देण्यात येणार असल्याची माहिती अत्यंत गुप्त ठेवायची होती.
कसाबच्या फाशी विषयी मीरा बोरवणकर आपल्या पुस्तकात म्हणतात की, ‘ज्यावेळी तपास अधिकारी म्हणून मी त्याला प्रश्न करत होते त्यावेळी तो हसायचा. कसाबबद्दल तुरुंग अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या पण कसाबला पकडण्यापासून ते फाशीपर्यंत भारत सरकारने कायदा पाळून सर्व प्रक्रिया पूर्ण केली’ असेही मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटल आहे.
एकदा तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी मला पुण्यातील सर्किट हाऊसला बोलावून घेतलं आणि फाशीबाबतची सगळी प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी पाटील यांनी जगातील काही देश कसाबच्या फाशीबाबत हस्तक्षेप करू शकतात अशी माहिती दिली. त्यानंतर मी दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करून पूर्ण प्लॅन तयार केला. असं त्या सांगतात. यापूर्वी राज्यात तीस वर्षांपूर्वी फाशी झाली होती. अनेक तुरुंग धूळ खात होते, त्यामुळे कसाबला फाशी देताना अनेक बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं होतं असं त्यांनी लिहिलय.