Ahmednagar Ashti Railway Fire: अहमदनगर-आष्टी रेल्वेला आग लागल्याची घटना घडली आहे. सोमवारी साडेतीन वाजताच्या सुमारास रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना ही आग लागली. रेल्वेच्या दोन डब्यांना आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
आज सोमवारी (दि. 16) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. रेल्वेच्या दोन डब्यातून धूर येताना दिसताच सर्वा प्रवाशांना सुखरूप गाडीबाहेर काढण्यात आले, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या भीषण आगीमुळे रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली आहे याची चौकशी करण्यात येणार आहे. या रेल्वेमधील प्रवासी तत्काळ बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.
दरम्यान, नगर-बीड-परळी या मार्गावर सप्टेंबर 2022 मध्ये नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या टप्यात रेल्वेसेवा सुरू करण्यात आली आहे. सुरवातीला दोन गाड्या सोडण्यात येत होत्या. मात्र प्रवाशांता प्रतिसाद कमी असल्याने सकाळी एकच गाडी सोडण्यात येते. त्यानुसार सोमवार सकाळी नगरहून ही गाडी प्रवासी घेऊन आष्टीला गेली. तेथून परत येत असताना नगर तालुक्यातील वाळूज या गावाजवळ आग लागली.