सणसवाडी- येथील सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच गोरक्ष भुजबळ व उत्तमराव भुजबळ यांनी लॉकडाऊन झाल्यानंतर गेले महिनाभर परप्रांतीय व उपासमार सोसणाऱ्या घटकांसाठी दिवसातून दोन वेळा सातशे ते आठशे लोकांना जेवण देत सामाजिक वसा जपला आहे.
सणसवाडी औद्योगिक परिसरात परराज्यातील कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात रोजंदारीवर काम करणारे बिगारी, हेल्पर व लहान मोठे भंगारगोळा करत उपजीविका करणारे शिवाय फासेपारधी समाजाची लोकंही येथे मोठ्या संख्येने आहेत.
त्यांचय उदरनिर्वाहाचा प्रश्न भुजबळ कुटुंबीयांनी सोडवला आहे. हे जेवण पॅकिंग स्वरुपात रांगेमध्ये सुरक्षित अंतर ठेवून दिले जात आहे. शिक्रापूर येथेही सामुदायिक विवाह सोहळ्याचे प्रणेते सुरेश भुजबळ हेदेखील चार ठिकाणी भोजन वाटप करत आहेत.