नवी दिल्ली – जम्मू काश्मीरसंबंधी असणारे कलम 370 केंद्र सरकारकडून हटवण्यात आल्यानंतर देशासह जगात याचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहेत. याचे पडसाद सोशल माध्यमांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. अशातच पाकिस्तानी गायक आतिफ असलमने सुद्धा या मुद्यावर ट्विट केले आहे. मात्र या ट्विटमुळे त्यांच्यावर चांगलीच टीका केली जात आहे.
Happy to share something very big with all of you. Inshallah I’ll be leaving soon for the most important (cont) https://t.co/7lBJRH1K7y
— Atif Aslam (@itsaadee) August 6, 2019
दरम्यान, हज यात्रेसाठी निघालेल्या आतिफ असलमने ट्विट केले आहे की,’मी तुम्हाला काही सांगू इच्छितो मी माझा जीवनातील लवकरच महत्त्वाची यात्रा पूर्ण करणार आहे. मात्र यात्रेला जाण्यापूर्वी मी माझ्या फॅन्स, कुटूंबाची क्षमा मागतो कारण माझ्यामुळे तुमचे मन दुखाऊ शकते, मी काश्मीरमध्ये होणाऱ्या हिंसा आणि अत्याचार मी तीव्र निषेध करतो, अल्लाह जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या निरागस लोकांवर आपल्या आशीर्वाद दे.’ असेही ट्विटच्या माध्यमांतून आतिफ असलमने जम्मू काश्मीरबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. या ट्विटमुळे भारतीय फॅन्सने नाराजी व्यक्त केली आहे.