मुंबई – राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहे, असा दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसे भाजपला विधान परिषद निवडणुकीत अंतर्गत कलहाचा फटका बसेल, असेही ते म्हणाले. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
नाना पटोले म्हणाले, तीनही पक्षांचा समन्वय, अपक्ष आणि सर्व लहान लक्ष आमच्याशी जुळलेली आहेत. दुसरीकडे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतगर्त कलह असून अनेक भाजप आमदार आमच्या संपर्कात आहेत.राज्यसभा निवडणूकीत काही चूका आमच्याकडून झाल्या होत्या, त्या यावेळी होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.