Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Press Confernce) यांनी जालन्यातील आंदोलनस्थळावर आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत फोनवरून केलेल्या चर्चेविषयीची माहिती दिली. अर्धा तास झालेल्या चर्चेत कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आरक्षणाबाबत चर्चा झाली असल्याचे सांगत मनोज जरांगे यांनी, आपण त्यांना स्पष्टपणे सांगितले, नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही.आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही, हे त्यांना स्पष्ट सांगितले. आम्ही अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा 2004 चा GR दुरुस्त करा” असे मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचे म्हटले.
तसेच शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. 60 -65 टक्के मराठा समाज अगोदरच obc मध्ये आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या, समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या.अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
पुढे त्यांनी मराठा आंदोलकांची आपण कालपासून पाणी पितोय, पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे. आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.
तसेच आरक्षणासाठी राज्यात सुरू असलेल्या राजीनामा सत्रासंदर्भात मनोज जरांगेंनी, सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते. बहुतेक आमदार मुंबईकडे गेलेत, राजीनामा देण्याचं कळत नाही. सर्व आमदार खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही. असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच राज्यात मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाविषयी मनोज जरांगेनी वक्तव्य करताना ,”मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये,” असे म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी बसच्या जाळपोळ झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. याविषयी बोलताना जरांगे म्हणाले, बस बंद करायला कोणी सांगितले. ST महामंडळवाले खूप घाबरतात. एसटीवाले खूप कलाकार आहेत. डोके आमचे फुटले आणि बस बंद होते” असे म्हणत महामंडळावर आरोप केला आहे.