Lok Sabha Election 2024| लोकसभा निवडणुकी गोरखपूर येथे सातव्या टप्प्यात १ जून रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र येथील एक उमेदवार चक्क तिरडीवर बसून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पोहचले होते. त्यांना तिरडीवाले बाबा उर्फ राजन यादव या नावाने ओळखले जाते. एवढेच नाही तर त्यांनी स्मशानभूमीत निवडणूक प्रचार कार्यालय उघडलं आहे. अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्याप्रकरणी ते चांगलेच चर्चेत आले आहे.
गोरखपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सातव्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरत आहेत. मंगळवारी ते तिरडीवर बसून अर्ज भरायला आला असता अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र काही त्रुटींमुळे राजन यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. गोरखपूर आणि बनसगाव लोकसभा जागांसाठी बुधवार, 15 मे रोजी झालेल्या नामनिर्देशनपत्रांच्या छाननीत एकूण 21 अर्ज वैध असल्याचे आढळून आले असून 22 अर्ज त्रुटींमुळे फेटाळण्यात आले आहेत. Lok Sabha Election 2024|
एमबीए डिग्री हाती घेऊन कुठलीही नोकरी न करता समाजसेवेत राजन यादव उतरले आहेत. 2007 पासून ते सातत्याने निवडणूक लढवत आहे. सर्वच निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले आहे. परंतु अद्याप त्यांना कोणत्याही निवडणूकीत यश मिळाले नाही. यावेळी 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही राजन यादव उर्फ अर्थी बाबा गोरखपूर सदर लोकसभा मतदारसंघातून नियुक्त उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होते.
लोकांनी भ्रष्ट लोकांना निवडून देऊ नये Lok Sabha Election 2024|
“सध्याचं राजकारण खूप खराब झालं असून प्रामाणिक लोकांची कमतरता जाणवते. त्यामुळे मी मैदानात उतरलो आहे. मी एमबीए केले आहे. शिक्षित आहे तर सध्या सिनेमात नाचणारे, गाणारे मैदानात उतरलेत. जनता त्यांना निवडून देते. निवडणूक जिंकून संसदेत पोहचणारे बहुतांश लोक भ्रष्ट झाले आहे. परंतु लोकांनी भ्रष्ट लोकांना निवडून देऊ नये,” असे आवाहन देखील यादव यांनी दिले.
पुढे ते म्हणाले, “ही तिरडी नसून ही आजच्या राजकारणाची अंत्ययात्रा आहे. शिक्षण असो, आरोग्य असो सगळीकडे लोकांची फसवणूक होते. गरीब, दलित, मजूर यांचं ऐकणारं कुणी नाही. राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी मी अर्ज भरत आहे जेणेकरून निवडणूक जिंकेन आणि असं काही करेन ज्यातून लोकांमध्ये जागृती होईल. मी भगवान बुद्ध यांच्या चरणात गेलो आहे. राजकारण्यांनीही त्यांच्या चरणी जावं, ज्यामुळे प्रामाणिकपणे समाजासाठी काही तरी भलं करू शकतील,” असंही उमेदवार राजन यादव यांनी म्हटलं.
हेही वाचा:
हिमाचलच्या कांगडा जिल्ह्यातील ‘या’ दुर्गम गावात फक्त 159 मतदार, पायी जाण्यासाठी लागतात 4 ‘दिवस’