manoj jarange patil । Nitesh Rane – मनोज जरांगे पाटील यांच्यावर नारायण राणे यांनी ते आता काहीही बरळत असल्याची टीका केली होती. या टीकेला मनोज जरांगे पाटलांनीही उत्तर दिले. जरांगे बोलल्यानंतर आमदार नीतेश राणे यांनी संयमी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
नीतेश म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे मोदींच्या राज्यातील सभा उधळणार असल्याचे बोलल्यानंतरच नारायण राणे यांनी त्यांना वडीलकीच्या नात्याने सल्ला दिला.
आम्ही त्यांना कायम पाठिंबा दिला आहे. तसेच जरांगे पाटलांना तुम्ही राजकीय टीका करू नका. हेच आम्ही सांगत आल्याचेही नितेश राणे यावेळी म्हणाले आहेत.
राणे पुढे म्हणाले की, मराठा समाजासाठी आम्ही काय केले ते आम्हाला काहीही सांगण्याची गरज नाही. मराठा समाजाला स्वतःचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळावे, हीच आमची भूमिका राहिलेली आहे. यामध्ये आम्ही सहभाग घेतला असून त्यासाठी लढलोही आहे.
आपण जबाबदारीने आरक्षणाचा प्रवास अंतिम टप्प्यात घेऊन गेलेलो आहे. काही दिवसांतच आपणाला हक्काचे आरक्षण मिळणार आहे.
त्यामुळे आपण समाज बांधवांनी समाजात एकजुट ठेवण्याचे काम करावे. जेव्हाही मराठा समाजावर कुठलेही संकट येईल तेव्हा आम्ही समाजाच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.