Jayant Patil Letter to CM Shinde : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वरुन ६० पर्यंत वाढवण्याला शरद पवार गटाने विरोध केला आहे. या संबंधी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यामुळे नवीन बेरोजगार आणि होतकरू उमेदवारांच्या संधी कमी होतील, अशी भीती जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.
वास्तविक कर्मचारी संघटनांनीच निवृत्तीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या निर्णयावर राज्य सरकार विचार करत आहे. आपण अशा प्रकारच्या निर्णयासाठी सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. | Jayant Patil Letter to CM Shinde
तसेच या निर्णयामुळे असंतोष निर्माण होण्याची तसेच मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची भीती देखील जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. तसेच ज्यांच्याकडे कमी संधी आहेत, अशा उमेदवारांना देखील त्याचा फटका बसण्याची शक्यता या पत्रात नमूद करण्यात आली आहे. | Jayant Patil Letter to CM Shinde
पाटील पत्रात पुढे म्हणतात, शासनाने अशाप्रकारे सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवल्यास आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल. पर्यायाने शासन सेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व प्रवेश करण्याची संधी मिळणार नाही. तसेच ज्यांच्याकडे शासन सेवेत प्रवेश करण्यासाठी अंतिम २ संधी असतील, असे नवीन बेरोजगार होतकरू उमेदवार शासन सेवेत अपात्र होतील आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल. या सर्वच गोष्टींमुळे राज्यातील तरुण वर्गात निराशा निर्माण होऊन त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होईल व मोठ्या प्रमाणात आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने आम्ही दिलेल्या पत्राची दखल घेऊन सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णय घेऊ नये ही विनंती, असेही त्यांनी म्हटले आहे. | Jayant Patil Letter to CM Shinde
महाराष्ट्र शासन, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरुन ६० पर्यंत वाढवण्याच्या विचाराधीन आहे. मात्र आमचा या निर्णयाला विरोध आहे. सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली जाऊ नये अशी आमची मागणी आहे. याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र लिहून अवगत केले.… pic.twitter.com/QtKTWXTiQ5
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 16, 2024