मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणा केलेले मनोज जरांगे यांनी १७ दिवसांनी उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी उपोषण सोडले. यावेळी मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.
अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहे. आजपासून जरांगें यांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, आज मनोज जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी या गावातून सकाळी आठपासून या दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज अंबड शहरात एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार असून त्यानंतर घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, परतूर, मंठा, या जालना जिल्ह्यातील गावानंतर ते मंठा-परतूर मार्गे ते जिंतूर, परभणी, हिंगोली असा त्यांचा दौरा करणार आहेत.
तत्पूर्वी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीमधील आंदोलना दरम्यान राज्य सरकाराच्या मुदतीस 14 ऑक्टोंबरला तीस दिवस पूर्ण होत आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून महाराष्ट्र राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे.