mann ki baat sbi report : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 3 ऑक्टोबर 2014 रोजी रेडिओद्वारे सुरू झालेला हा कार्यक्रम आता 10 व्या वर्षात पदार्पन करत आहे. या निमित्ताने SBI ने कार्यक्रमाच्या यशाशी संबंधित एक विशेष अहवाल जारी केला आहे. त्यानुसार पंतप्रधानांच्या या कार्यक्रमामुळे स्वच्छता अभियान, मुलीसोबत सेल्फी, प्रत्येक घरात तिरंगा अशा मोहिमांना प्रोत्साहन मिळाले आहे.
पण या सामाजिक कार्यक्रमांसोबतच ‘मन की बात’मुळे आर्थिक योजनांचाही भरपूर फायदा झाला आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, मन की बातने पीएम मुद्रा, स्वानिधी, सुकन्या समृद्धी, जन धन खाते यासारख्या आर्थिक परिवर्तनाशी संबंधित कार्यक्रमांनाही चालना मिळाली आहे.
‘मन की बात’ने खादी प्रसिद्ध केली –
एसबीआयने दोन उदाहरणे दिली आहेत. पंतप्रधानांनी मन की बातमध्ये खादीचा उल्लेख केल्यावर खादीची विक्री वाढल्याचे म्हटले आहे. देशांतर्गत पर्यटनाबद्दल बोलत असताना देशांतर्गत पर्यटनाला फायदा मिळू लागला आहे. एसबीआयच्या अहवालानुसार, पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये कोणत्याही योजनेचा उल्लेख करतात, त्या योजनेचे गुगल सर्च वाढते आणि सोशल मीडियावर ती वेगाने पसरते.
जेव्हा पंतप्रधानांनी मन की बातमध्ये खादीला प्रोत्साहन देण्याबद्दल बोलले तेव्हा खादीची विक्री 2016-17 मध्ये 1520.83 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 2558.31 कोटी रुपयांपर्यंत वाढली. खादीची मागणी वाढल्याने खादीचे उत्पादनही वाढले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध झाला.
सुकन्या समृद्धी योजनेवर ‘मन की बात’ची जादू!
तसेच ‘मन की बात’मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा उल्लेख आल्यानंतर या योजनेकडे लोकांचा कल वाढला. SBI च्या अहवालानुसार, सुकन्या समृद्धी अंतर्गत आतापर्यंत 3.6 कोटी खाती उघडण्यात आली आहेत, ज्यामध्ये 2 लाख कोटी रुपये जमा आहेत. पंतप्रधानांनी फेब्रुवारी 2020 मध्ये मन की बातच्या 62 व्या भागात रस्त्यावर विक्रेत्यांना कर्जाशी संबंधित पीएम स्वानिधी योजनेचा उल्लेख केला. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांमध्ये स्वानिधी योजना लोकप्रिय झाली असून आतापर्यंत 65.5 लाख पथारी व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले आहे.
‘मन की बात’मधून पर्यटनाला चालना –
पंतप्रधानांनी तीन वर्षांपूर्वी मन की बातमध्ये भारतात वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लाइटहाउसचा उल्लेख केला होता. अहवालानुसार, या उल्लेखानंतर, गुगलवर लाइटहाउसशी संबंधित शोधांची संख्या दीड पटीने वाढली, ज्यामुळे पर्यटनाला फायदा होईल आणि राज्य सरकारे आपापल्या राज्यात असलेल्या लाइटहाउसना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करतील.
रिपोर्टनुसार, पंतप्रधानांनी 2015 मध्ये मन की बातमध्ये मुद्रा लोनचा उल्लेख केला होता आणि तेव्हापासून मुद्रा लोनबाबत गुगल सर्चमध्ये वाढ झाली आहे. यानंतर, कोरोनाच्या काळात, गुगल सर्चमध्ये पुन्हा एकदा मुद्रा लोन सर्वाधिक लोकप्रिय झाले होते.