नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीतही पाचही राज्यांत कॉंग्रेस (Congress) पक्ष सरकार स्थापन करेल असा विश्वास कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (mallikarjun kharge) यांनी व्यक्त केला आहे. येथे एएनआयशी बोलताना खर्गे म्हणाले की, छत्तीसगड आणि राजस्थानमधील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारे त्यांचे काम योग्यरित्या करत आहे आणि तेथील लोकांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही.
या राज्यांच्या निवडणुकांसाठी कॉंग्रेसची तयारी चांगली सुरू आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व राज्यांमध्ये विजयी होऊ. मुख्यत: महागाई आणि बेरोजगारीमुळे भाजपच्या विरोधात मोठे वातावरण निर्माण झाले आहे.
मध्यप्रदेशात भाजपने (MP Bjp) गेल्या अठरा वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारने तेथे कितीही आश्वासने दिली तरी जनता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही.
कर्नाटकात कॉंग्रेसचे (Congress) सरकार सत्तेवर आल्यामुळे केंद्र सरकार या राज्याशी आकसाने वागत आहे आणि राज्याला केंद्राकडून कोणतीही मदत दिली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला.