वाई – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील घडामोडींच्या काळात द्विधावस्थेत असलेल्या आमदार मकरंद पाटील यांनी आपल कार्यकर्त्यांसह आज शनिवारी अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईतील निवासस्थान देवगिरी गाठले. आमदार मकरंद पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील व्हावे, अशी आग्रही मागणी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यानुसार आ. मकरंद पाटील यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली.
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी तसेच किसन वीर साखर कारखान्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी आमदार पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घ्यावा असा ठराव कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानुसार श्री. पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह “देवगिरी’वर गेले. यावेळी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, सुनील तटकरे,आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडताना अजित पवार यांच्या शपथविधीच्यावेळी आ. पाटील उपस्थित होते.
नंतर दुसऱ्याच दिवशी ते शरद पवार यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यात होते. मात्र, त्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. त्याचे पडसाद समाजमाध्यमातून दिसत होते. बाजार समितीच्या सभागृहात काल वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तीन तालुक्यांतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा बैठक पार पडली. यावेळी आमदार पाटील यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय का घ्यावा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आजवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी मदत केली असून भविष्यातही अशा प्रकारे मदत मिळावी, भुईंज व खंडाळा येथील कारखाने आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी व शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मदत मिळावी यासाठी अजित पवार यांच्या गटात सामील होणे हिताचे असल्याची मत अनेक कार्यकर्त्यांनी मांडले. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या निर्णयाची माहिती आमदार मकरंद पाटील यांना देण्यात आली आहे.
या बैठकीत वाई तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपुरे, संजय गायकवाड, अफजल सुतार, नारायण बिरामणे, शेखर कासुर्डे, नितीन भरगुडे पाटील, दत्तानाना ढमाळ, शामराव गाढवे, मनोज पवार, उदय कबुले राजेंद्र तांबे, अजय नाना भोसले, रफिक मुजावर, शशिकांत पिसाळ, रमेश गायकवाड, दासबाबु गायकवाड, संजय लोळे, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, भूषण गायकवाड, चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, प्रदीप जायगुडे, संदीप नायकवडी, धनंजय हगिर, भारत खामकर, डी. बी खरात, सर्व कारखान्याचे संचालक, बाजार समितीचे संचालक, मदन आप्पा भोसले, शंकर शिंदे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मुंबईत शनिवारी झालेल्या बैठकीत राजेंद्र राजपुरे, उदय कबुले, शशिकांत पिसाळ, प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, मोहन जाधव,अनिल सावंत,चरण गायकवाड, सचिन शिंदे, श्रीकांत सावंत, विशाल चोरगे, राजेश गुरव, संदीप नायकवी, संग्राम पवार, रमेश गायकवाड, युगल घाडगे,सत्यजीत वीर, शशिकांत पवार, प्रताप पवार, बाळासाहेब सोळसकर, प्रदीप जायगुडे, मनीष भंडारे आदी प्रमुख उपस्थित होते.