पाचगणी -कासवंड (ता. महाबळेश्वर) येथे विहिरीत पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पाचगणी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, की काल रात्री पावणेआठच्या सुमारास कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील बामणकी शिवारातील सामाईक विहिरीमध्ये चंद्रकांत लक्ष्मण गोळे (वय 61, रा. गोळेवाडी कासवंड, ता. महाबळेश्वर) हे पाय घसरून विहिरीत पडले.
त्यानंतर पाण्यात बुडून त्यांना मृत्यू झाला. घटनेची फिर्याद मृताचा पुतण्या शरद आत्माराम गोळे (वय 26, रा. गोळेवाडी कासवंड) याने पाचगणी पोलिसात दिली आहे. या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत.