कोथरूड – करोना काळात औद्योगिक क्षेत्राला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उद्योजकांना भरीव मदत केली. पण, महाराष्ट्र सरकारने उद्योजकांना कवडीचीही मदत केली नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
पुण्यात भाजप उद्योजक आघाडीच्या आयोजित बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रदीप पेशकार, सहसंयोजक सुधीर धुत्तेकर, अर्चना वाणी, पुणे शहर संयोजिका अमृता देवगांवकर, पश्चिम महाराष्ट्र संयोजक संजय अरणके यांच्यासह उद्योग आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.